Wednesday 1 June 2016

अजिंठा (लेणी) Ajantha Caves

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.











हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

अजिंठा गावापासून अजिंठा लेण्या ह्या ११ किलोमीटर अंतरावर आहे . इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातल्या त्या अजिंठा लेण्या कोरीव कामात व रंगीत भिंतीचित्रासाठी जग प्रसिध्द आहेत . इंग्रजी लष्करातील अधिकाऱ्यांना १८१९ साली या लेण्यांचा शोध लागला.एकूण ३० लेण्या आहेत व त्या सर्व लेण्या बौद्ध धर्मीय आहेत याच प्रमाणे कोरिवे काम असलेले बौद्ध मंदिरे, गुफा, बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग हे अतिशय आकर्षित व आश्चर्य करणारे आहेत




औरंगाबाद अजिंठा ह्या रस्त्यावरून जातांना ह्या लेण्यांचे अतिशय विस्मरणीय असे दृश्य दिसून येते ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण हे टाळले जाते . येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत.मार्ग : - जळगाव रेल्वे स्टेशन पासून 59 किलोमीटर अंतरावर . औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला .

लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839 मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

अशी सापडली लेणी

शिकारीसाठी जॉन स्मिथ अजिंठा लेणीच्या घळीसारख्या पर्वतावर आला होता. येथून त्याला पर्वताच्या उदरात काहीतरी बांधकाम दडले असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना येथे लेण्या आढळून आल्या. त्यानंतर लेण्यांची स्वच्छता करण्यात आली.
सप्तकुंड तलाव

घळीसारख्या पर्वतावरुन धबधब्याच्या रुपांनी कोसळणारे निळेशार पाणी या तलावात जमा होतो. त्यामुळे याला सप्तकुंड असे नाव पडले असावे. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची 56 मीटर असून सुमारे 550 मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत.

अशी काढली दगडांवर सुंदर चित्रे

प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात डोंगरातील दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

No comments:

Post a Comment